कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमानी योजना 2024 | भूमिहीन शेतमजूर योजना

मित्रांनो आज आपण एका नवीन योजनेबद्दल जाणून घेणार आहोत ती म्हणजे आदिवासी विकास योजना महाराष्ट्र अंतर्गत कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान  योजनेची माहिती पाहणार आहोत.  ही योजना राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील व्यक्तींना शासनाकडून जमिनीची खरेदी करून रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी म्हणून सुरू करण्यात आलेली आहे. तसेच  भूमिहीन शेतमजुरांसाठी हक्काची जमीन मिळावी म्हणून अमलात आणल्या गेलेले आहे.  या योजनेअंतर्गत शासनाकडून शेतमजुरांना जमीन खरेदी करून ती भूमिहीन आणि सूचित जाती प्रवर्गातील कुटुंबाच्या नावे केली जाते.  विधवा स्त्रियांच्या बाबतीत जमीन त्यांच्या नावे केली जाते.  तर चला तर मित्रांनो आपण या योजनेबद्दल अधिक माहिती घेऊया जसे की या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणती पात्रता आहे, कोणत्या अटी आहेत,  लाभ कोणता, कोणकोणती कागदपत्रे आवश्यक आहे अर्ज कुठे आणि कसा करायचा.

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमानी योजना  भूमिहीन योजना

हे देखील वाचा: प्रधानमंत्री पिक विमा योजनेच्या लाभार्थ्यांची यादी कशी पहायची?

भूमिहीन योजना शासन निर्णय 2021:

 नवीन आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पीय अंदाज, वितरण, व नियंत्रण प्रणालीवर वितरित करण्यात आलेली सुधारित तर दुधीच्या मर्यादेतील उर्वरित रुपये 12,1500000 ( 12 कोटी ५० लाख रुपये) रुपये खर्च करण्यासाठी शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे.

Join Whatsapp Channel

 भूमिहीन योजना 2022 चा लाभ:

 या योजनेअंतर्गत प्रवर्गातील दारिद्र्यरेषेखालील जुनी शेतमजूर कुटुंबाला 4 एकर कोरडवाहू जमीन किंवा 2 एकर बागायती जमीन उपलब्ध करून त्यांच्या नावे करून देण्यात येते जमीन खरेदीसाठी येणाऱ्या खर्चापैकी 50 टक्के रक्कम बिनव्याजी कर्ज तर 50 टक्के रक्कम अनुदान स्वरूपात देण्यात येते.

हे देखील वाचा: आदिवासी कर्ज(Loan) योजना महाराष्ट्र 2023 संपूर्ण माहिती

भूमिहीन योजना साठी अटी:

  • लाभार्थी हा भूमिहीन दारिद्र्यरेषेखालील  शेतमजूर असावा.
  •  योजनेच्या लाभासाठी अर्जदाराचे वय कमीत कमी 18 व जास्तीत जास्त वय 60 वर्षे निश्चित केले.
  •  विधवा स्त्रियांना योजनेतील लाभासाठी प्राधान्य देण्यात आलेले आहे.
  •  जमीन खरेदी करताना तीन लाख रुपये प्रति एकरी एवढ्या कमीत कमी मर्यादेपर्यंत चर्चेद्वारे जमीन खरेदी करण्याची मुभा जिल्हास्तरीय समिती देण्यात आलेली आहे.
  •  या योजनेअंतर्गत यापूर्वी लाभ घेतलेल्या संबंधित कुटुंबाला कोणत्याही कारणास्तव जमीन अन्य करतो त्याही व्यक्तीला हस्तांतरित करता येत नाही किंवा विकता येत नाही.
  •  या योजनेअंतर्गत लाभ घेऊन जमीन मिळवलेल्या लाभधारकांनी जमीन स्वतः कसणी गरजेचे असून तसा करारनामा करून देणे बंधनकारक आहे.
  •  महसूल व वन विभागाने ज्यांना गायरान व सीलिंगच्या जमिनीचे वाटप केले आहे अशा कुटुंबांना योजनेचा लाभ देण्यात येणार नाही.
  •  या योजनेअंतर्गत लाभार्थी कुटुंबाला देण्यात येणारे कर्ज हे बिनव्याजी दहा वर्षे मुदतीसाठी असणार आहे.
  •  कर्ज फेडायची सुरुवात कर्ज मंजुरीनंतर दोन वर्षानंतर सुरू होईल.
  •  कुटुंबाने विविध मुद्दतीत म्हणजेच कर्ज घेतल्यापासून दहा वर्षात कर्ज परतफेड करणे आवश्यक आहे.

 मित्रांनो आपण जाणून घेतली या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणकोणत्या अटी आहे.  आता आपण जाणून घेऊया या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणकोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे.

हे देखील वाचा: शेतकऱ्यांसाठी केंद्राची प्रधान मंत्री पिक विमा योजना|पहा योजनेचे फायदे

 भूमिहीन योजना महाराष्ट्र साठी लागणारी आवश्यक कागदपत्रे:

  •  रहवासी दाखला
  •  आधार कार्ड
  •  रेशन कार्ड
  •  निवडणूक कार्ड
  •  अर्ज लिहित नमुन्यात पासपोर्ट फोटोसह भरावा
  • अनुसूचित जाती-जमाती  प्रवर्गातील असल्याचे जात प्रमाणपत्र
  •  भूमिहीन शेतमजूर असल्याबाबत तहसीलदार दाखवा
  •  मागील वर्षाचा वार्षिक उत्पन्नाचा तहसील दाखला
  •  वय 60 वर्षाखालील असल्याचा वयाचा दाखला किंवा पुरावा
  •  लाभार्थी दारिद्र रेषेखालील असल्याबाबत विहित प्रमाणपत्र
  • शेत जमीन पसंती बाबत लाभार्थ्याचा शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपर वरील प्रतिज्ञापत्र

 भूमी योजना महाराष्ट्र साठी अर्ज कुठे करावा:

 तर मित्रांनो जर या योजनेचा लाभ घेण्यासाठी वरील सर्व अटी व पात्रता  लाभ घेण्यास पात्र असल्यास  संबंधित जिल्ह्याच्या सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयात अर्ज सादर  करावा.

Leave a Comment

कॉपी करू नका, तर  शेअर करा!